शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

देवरूख : नगर पंचायत : समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, वाहनचालकांची मोठी गैरसोय -वाहन पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:08 IST

देवरूख शहरामध्ये होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नगर पंचायतीकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना काहीअंशी यशदेखील येत आहे. मात्र, शहरामध्ये विविध कामांकरिता येणाºया नागरिकांच्या वाहनांसाठी

देवरूख : देवरूख शहरामध्ये होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नगर पंचायतीकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना काहीअंशी यशदेखील येत आहे. मात्र, शहरामध्ये विविध कामांकरिता येणाºया नागरिकांच्या वाहनांसाठी हक्काची पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. देवरूख नगर पंचायतीने पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे. 

 देवरूख नगर पंचायत, पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरात वाहतूककोंडी होऊ नये याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये शहरातील व्यापाºयांची बैठक घेऊन त्यांना योग्य सूचना देणे, बैठकीनंतर त्यांना रितसर नोटीस देणे, नोटीस दिल्यानंतर मार्गावर असलेले अतिक्रमण न हटवल्यास कारवाईचे संकेतही देण्यात आले होते. तसेच कारवाईचे संकेत देताना पोलीस प्रशासन, तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी व नगर पंचायतीचे मुख्याधिकाºयांनी बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी करून व्यापाºयांना योग्य त्या सूचनादेखील केल्या होत्या. 

त्यानंतर शहरातील व्यापाºयांनी या सूचनांची अंमलबजावणी करताना गटारावर असणारे दुकानांचे नामफलक हटवून मार्ग मोकळा केला  होता. मात्र, तालुक्याच्या ग्रामीण भागातून देवरुख शहरात विविध कामांसाठी वाहने घेऊन येणाºया नागरिकांना आपली वाहने उभे करून ठेवण्यासाठी हक्काची जागा नसल्याचे चित्र सध्या आहे. देवरूख शहर हे तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने याठिकाणी पदवी महाविद्यालये, दवाखाने, विविध शासकीय कार्यालये, विविध राष्टयीकृत बँका याचबरोबरच मोठी बाजारपेठ असल्याने तालुक्याच्या कानाकोपºयातून देवरूखमध्ये वाहने घेऊन येणाºयांची संख्या लक्षणीय आहे.

वाहन घेऊन आलेल्यांनी आपली वाहने कोठे उभी करायची? असा प्रश्न त्यांना पडतो. यावेळी दुकानांसमोर वाहने उभी केल्यास वाहतूककोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी हक्काची जागा मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी देवरूख बसस्थानकाबाहेर किमान १००पेक्षा अधिक दुचाक ी पार्क होत होत्या. मात्र, गणेशोत्सव काळात वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून देवरूख आगाराच्या जागेत पार्किंग करण्याला सध्या मनाई करण्यात आली आहे.

आगाराची ही जागा असल्याने आगाराने घेतलेला हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. मात्र, याठिकाणी उभ्या केल्या जाणाºया दुचाकींसाठी शहरात पर्यायी जागा उपलब्ध झालेली नाही. याकडे देवरूख नगर पंचायतीचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नगर पंचायतीने पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून दिल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गेली कित्येक वर्ष शहरात पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून देणार असल्याचे नगर पंचायतीकडून सांगण्यात आले होते. मात्र, ती केवळ घोषणाच ठरली आहे. त्यामुळे देवरूख शहरात पार्किंगचा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगRatnagiriरत्नागिरी